सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

सुविचार संग्रह भाग २

 

सुविचार संग्रह भाग २ 

201  दुर्जन कितीही मातला तरी अखेर त्याला पापाचे शंभर अपराध घडल्यावर केलेल्या कृत्याचा भोग भोगावाच लागतो.

202  केल्या कर्माची फळे माणूस याच जन्मी भोगत असतो पण ते बघायला सोसणारा असतोच असे नाही.

203  पोट हे माणसाला काहीही करायला भाग पाडते.

204  गरीबांच्या जीवावर श्रीमंतांची पोळी भाजत असते.

205  स्त्री पुरुषाची दासी किंवा बटीक नाही तर ती गृहदेवता आहे.

206  संतुट स्त्री हेच घराचे सौभाग्य. स्वच्छता हीच खरी दौलत. समाधान हेच घराचे वैभव.

207  पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पुढून वार करणारा शत्रू परवडला.

208  कळीचे फुल उमलले की मध चाखायला भुंगे जमतात.

209  दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावे लागते.

210  बिंदूचा जन्म जसा विरण्यासाठी असतो तसे त्यागी माणसाचे जीवन विरक्तीत असते.

211  हिंदुधर्म संस्कृती ही एक सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, तिच्यावरच सर्व जगाची पाळेमुळे पोसली आहेत. .

212  घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना!

213  क्षणैक राग हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.

214  क्षणैक मोह हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.

215  एक खोटे बोललेले लपविण्यासाठी अनेकवेळा खोटे बोलावे लागते.

216  आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार असतो.

217  एकवेळ विष पचविणे सोपे पण यश पचविणे अवघड आहे.

218  मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच्या मृत्यूचे दुःख जास्त असते.

219  आपल्या पडीक काळात जो उभा राहतो तो खरा मित्र.

220  आयुष्य हे यश अपयश याचा खेळ आहे.

221  तुमच्या महत्त्वाकांक्षेला किल्ली द्या, पराक्रम आपोआप होतो.

222  महत्त्वाकांक्षा नेहमी चांगली ठेवा.

223  आपल्या महत्त्वाकांक्षेने जर एखाद्याचे नुकसान होत असले तर ती महत्त्वाकांक्षा नव्हे, राक्षसी लालसा होय.

224  मरणाचा मार्ग मोक्षाच्या मैदानातून जातो.

225  फुल फुलले की त्याला स्पर्श व हुंगण्याचा मोह हा होतोच.

226  पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके नव्हे.

227  मनात किंतू आला की तो विंचू म्हणून ठेचावा.

228  बकरी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एक वर्ष जगा.

229  कला ही नैसर्गिक देणगी असते तिचा विकास करणे आपल्या हातात असते.

230  विद्या विनयेन शोभते.

231  दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण होय.

232  ईश्वराच्या दरबारात श्रेष्ठ व कनिष्ठ, श्रीमंत व गरीब हा भेदभाव नसतो. म्हणून तो आपल्या मनातही ठेवू नये.

233  तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.

234  तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.

235  परमेश्वर हा इकडे तिकडे नसून तो आपल्या हृदयात असतो.

236  शब्द हे शस्त्र आहे ते जपूनच वापरा.

237  तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण हा कधीही परत येत नाही.

238  जखम भरून येते पण व्रण मात्र तसाच रहातो.

239  घेतलेले काम मग ते लहान असो वा मोठे ते जिद्दीने तडीस न्या.

240  शहाणा माणूस चूक विसरतो पण तिची कारणे विसरत नाही.

241  जो चोच देतो तोच चारा देतो.

242  आयुष्याच्या वाटेवर भोग व त्याग हेच दोन रस्ते आहेत.

243  तहानलेल्याला विहीरीवर नेले तर तो पाणी पितो. पण ज्याला तहानच लागली नाही त्याला जर विहीरीवर नेले तर तो कोरडाच परत येतो.

244  स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते.

245  यशाचा डोंगर गाठायचा असेल तर जिद्द आणि चिकाटी सोडू नका.

246  स्वप्नरंजन करणे म्हणजे मृगजळ बघणे.

247  जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.

248  माणसाच्या जिवनाच्या पतंगाची दोरी नियतीच्या हातात असते.

249  घरात अपशब्द बोलू नका वास्तू तथास्तू म्हणत असते.

250  घरात वाढणारी मुलगी व दारात येणारी चिमणी या दोघीही सारख्या असतात. चिमणी दाणे टिपून जाते तर मुलगी सासरी जाते.

251  प्रत्येकजण आपापले नशिब घेऊन येत असतो.

252  प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.

253  मुळावर घाव घातल्यावर फांद्या आपोआप तुटतात.

254  सरस्वती विद्येची भोक्ती, लक्ष्मी उद्योगाची भोक्ती, अक्काबाई आळसाची भोक्ती. या तीन देवींतून आपण कोणाची उपासना करायची हे आपणच ठरवायचे.

255  आळस हा माणसाचा शत्रू आहे.

256  उद्योग हा माणसाचा मित्र आहे.

257  पैशाने श्रम विकत घेता येतात, पण मन नाही.

258  माणसाने माणूसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.

259  दुबळी माणसे नेहमी रडगाणे ऐकविण्यासाठी उभी असतात.

260  साध्या गवताची दोरी वळली तर मदमस्त हत्तीही बांधला जातो.

261  गरीबांचा अपमान करू नका व श्रीमंतांची स्तुती करू नका.

262  फिनिक्स पक्षी हा राखेतून जन्माला येत असतो.

263  मरावे परी कीर्ती रूपे उरावे.

264  सत्य हे अजरामर असते.

265  परिस्थितीशी जुळवून घ्या पण लाचारी पत्करू नका.

266  अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल. 

267  मित्र परीसारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत.

268  आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

269  रागाला जिंक्ण्याचा एकमेव उपाय – मौन

270  देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.

271  नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा माणसाचा शत्रू.

272  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.

273  परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी.

274  भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.

275  प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच.

276  अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही.

277  किर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते.

278  संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.

279  गणिताच्या अरण्यातून जातांना सूत्रांची  बंदूक हाती घ्यावीच लागते.

280  कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.

281  जीवाचे रान केल्याशिवाय विद्याचे उद्यान  फुलत नाही.

282  अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे.

283  आवड असली तरच सवड मिळू शकते.

284  इच्छा असेल तर मार्ग दिसेल.

285  प्रेम हि नेसर्गाची खरी प्रेरणा आहे.

286  गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीना जन्म देते.

287  कृती चटका लावणारी असावी, देणारी नको.

288  जीवन म्हणजे सुख दुःखाच्या उनपावसाचा खेळ आहे.

289  जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणेच असावे.

290  जो मूळचाच सद्गुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.

291  जो ओरडतो त्याला अंतकरण असते.

292  जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरवते.

293  प्रेम सर्वांवर करा; विश्वास थोड्यांवर ठेवा; पण व्देष मात्र कोणाचाच करू नका.

294  जो समंजसपणे दु:खे सहन करतो तो खरा शूर.

295  तिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे भरून निघते.

296  आनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो.

297  ज्याची आपल्याला भीती वाटते त्याचीच आपण निंदा करतो.

298  आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

299  उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

300  पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

301  अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

302  मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

303  रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

304  अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

305  अंथरूण बघून पाय पसरा.

306  कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

307  तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

308  अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

309  संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

310  सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

311  सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

312  शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥

313  सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

314  शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.

315  जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

316  एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

317  कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

318  आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.

319  ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

320  कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

321  देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

322  आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

323  मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

324  ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

325  जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

326  आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

327  रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

328  जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

329  लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

330  कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

331  जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

332  पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

333  आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

334  गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

335  कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

336  स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

337  ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.

338  जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

339  सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

340  श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

341  आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

342  एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

343  प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

344  आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

345  आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

346  स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

347  अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.

348  हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

349  आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

350  बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

351  कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

352  टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

353  नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

354  यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

355  आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

356  खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

357  जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

358  प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

359  स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

360  आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

361  माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

362  जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

363  तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

364  शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

365  हसा, खेळा पण शिस्त पाळा.

366  आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

367  स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

368  तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

369  काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

370  काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

371  एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

372  हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

373  उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

374  या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

375  तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

376  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

377  दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

378  माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

379  प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

380  व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

381  काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

382  दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

383  शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

384  जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

385  दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

386  शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

387  जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

388  परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

389  ऐकावे जनाचे करावे मनाचे.

390  एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

391  केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

392  बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

393  चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

394  तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

395  दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

396  स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

397  स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

398  त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

399  जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

400  दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

भाग १                                                       भाग ३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा