अरण्य आणि लाकुडतोड्या
एकदा एक
लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या
झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं
आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला
दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर
बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक
तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला
घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला.
तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला
आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’
तात्पर्य – शत्रूची कीव करून
त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार
करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी
खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा
प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा