महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
उत्तरेस : मध्यप्रदेश.
पूर्वेस : छत्तीसगड.
आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
– भारतातील 29 राज्यांपैकी एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा